भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी तिघांना सहा वर्षाची शिक्षा

भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी तिघांना सहा वर्षाची शिक्षा

इंदूर : अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात इंदूर न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. मध्य प्रदेशातील इंदूर न्यायालयात शुक्रवारी अंतिम सुनावणी पार पडली. न्यायालयाने मुख्य सेवक विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी तिघांना न्यायालयाने प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा दिली आहे. न्यायालयाने आदेश देताना म्हटले की, भय्यू महाराज यांचा सेवकांनी इतका छळ केला की त्यांनी आत्महत्या केली. १२ जून २०१८ रोजी भैय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, साडेतीन वर्षांच्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला. उच्च न्यायालयाने हा गुन्हा सिद्ध केला आहे.

या प्रकरणात आता तिघांना शिक्षा देण्यात आली असली तरी भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांची मुलगी आणि त्यांची दुसरी पत्नी यांच्यातील वाद उफाळून आला होता. त्यामुळे या भय्यू महाराज यांच्या आत्महत्येला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. आत्महत्याप्रकरणात त्यांच्या मुलीचे आणि दुसऱ्या पत्नीचे नाव गोवले गेल्याने या आत्महत्येची जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे न्यायालयाचा निकाल काय लागणार याकजडे महाराजांच्या भक्तांसह अनेकांच्या नजरा लागल्या होत्या.

भय्यू महाराज यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले होते. ते महाराज म्हणून नावारुपाला आल्यानंतर त्यांचा भक्तगणही मोठ्या प्रमाणात वाढला होता. सामान्य नागरिकांसह अनेक सेलिब्रेटीही त्यांचे भक्त होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येनंतर अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतर त्यांची शिष्या आणि भय्यू महाराज यांच्या व्हॉटस्अप चॅट पोलिसांना तपासल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत गेली. त्यामुळे प्रत्येक तपासानंतर वेगवेगळी माहिती समोर येत गेली.

भय्यू महाराज यांनी आपल्या मालकीची असलेली रिव्हॉलरने २०१८ मध्ये गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली होती. ज्या तिघांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे, त्यांनी भय्यू महाराज यांना आत्महत्या करण्यास कारणीभूत असल्याच्या कारणावरुन त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. भय्यू महाराज यांना शिक्षा झालेले आरोपी पैश्यासाठी त्रास देत होते. त्यामुळे न्यायालयाने पलक, शरद आणि विनय यांना आत्महत्यप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. यामधील पलक ही त्यांची शिष्या होती. तर विनायक सेवाकार आणि शरद हा त्यांचा खासगी चालक होता.

इंदौरच्या भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी या तिघांना २०१९ मध्ये त्यांना अटक केली होती. त्यावेळीच ही माहिती समोर आली की, या तिघांनी मिळून भय्यू महाराज यांना आर्थिक आणि मानसिक त्रास दिला होता. भय्यू महाराज यांनीच आपल्या सुसाईड नोटमध्ये विनायक यांनाच आपल्या आत्महत्येला जबाबदार धरले होते. कारण त्यांनी आत्महत्या करण्याअगोदर गेल्या पंधरा वर्षापासून त्यांचा सेवक म्हणून तो होता.

भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांची मुलगी आणि त्यांची दुसरी पत्नी आयुषी यांच्या वादाचे चित्र रंगवण्यात आले होते.त्यानंतर त्यांच्या आत्महत्येची मुख्य कारणे समजली की, त्यांच्या जवळचीच माणसे त्यांच्या जीवावर उठली होती.

पैशांसाठी ब्लॅकमेल

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात सत्र न्यायालयात साडे तीन वर्षे सुनावणी चालली. न्यायमूर्ती धर्मेंद्र सोनी यांनी महाराजांचे सेवक असलेल्या शरद देशमुख, विनायक दुधाले आणि पलक पुराणिक यांना महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात दोषी ठरवलं. या तिघांनी पैशांसाठी महाराजांचा छळ केला. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेल केलं, असं न्यायमूर्तींनी निकाल देताना म्हटलं. काही सेवकांना भय्यू महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कुटुंबीयांपेक्षा जास्त महत्त्व दिलं. त्यांच्यावर खूप विश्वास टाकला. आपल्या आश्रमाची आणि कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली, त्याच सेवकांनी पैशांसाठी महाराजांचा छळ केला. हा छळ इतका जास्त होता की त्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असं सोनी यांनी निकाल सुनावताना म्हटलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: