सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा? – आशिष शेलार

सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा? – आशिष शेलार

काल रात्रीपासून मुंबई पडणाऱ्या धो-धो पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलेले आहे. त्यातच दादर, माहीम, माटुंगा, चेंबूर आणि मुंबई सेंट्रल सारख्या सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. याचा नाहक त्रास आता मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. याच पाश्वभूमीवर आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ट्विट करत सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

आशिष शेलार ट्विटमध्ये म्हणतात की, विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत.

त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे! असे ट्विट शेलारांनी आज केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: