पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघरच्या मच्छिमाराचा मृत्यू

 

गुजरात | पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील पालघर जिल्यातील मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे. गुजरात राज्यातील वनग बारा येथील जयंतीभाई यांच्या जलपरी बोटीत श्रीधर चामरे हा तरुण मागील तीन महिन्यापासून खलाशी कामगार म्हणून कामावर गेला होता. ओखा-पोरबंदर भागातील समुद्रात बोटीवर मासेमारी करीत असताना पाकिस्तान ट्रॉलर्समधून आलेल्या सैनिकांनी गोळीबार केला.

पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या या गोळीबारात वडराई येथील मच्छिमार श्रीधर चामरे यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या या गोळीबारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. गुजरात राज्यातील जलपरी या बोटीवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे हा तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. बोटीचे कॅप्टन (तांडेल) हे देखील या गोळीबारात जखमी झाले आहेत.

गुजरात राज्यातील वनग बारा येथील जयंतीभाई यांच्या जलपरी बोटीत श्रीधर चामरे हा तरुण मागील तीन महिन्यापासून खलाशी कामगार म्हणून कामावर गेला होता. ओखा-पोरबंदर भागातील समुद्रात बोटीवर मासेमारी करीत असताना पाकिस्तान ट्रॉलर्समधून आलेल्या सैनिकांनी गोळीबार केला. या गोळीबारात वडराई येथील मच्छिमार श्रीधर चामरे यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

श्रीधर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती बोट मालक जयंतीभाई यांनी आपणास दिल्याचे वडराई मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन माणेंद्र आरेकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बोटीचे कॅप्टन तांडेल यांना गोळी लागल्याने जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Team Global News Marathi: