विरोधी पक्षांनी कितीही एकत्र आले तरी २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान

 

 

ठाणे | विरोधी पक्षांनी कितीही एकत्र आले तरी नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केला. भाजपतर्फे काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेला ठाण्यातून सुरवात करण्यात आली होती यावेळी मंत्री कपिल पाटील यांनी हे विधान केले होते. तसेच अनेक दिवसांपासून राज्यात तापत असलेल्या  नवी मुंबई विमानतळावर भाष्य करताना नियोजित नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे, ही स्थानिक भूमीपुत्रांचीच इच्छा आणि मागणी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

ठाणे जिल्ह्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथमच समावेश झालेल्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पाच दिवस जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. याच यात्रेचा प्रारंभ ठाण्यातील आनंदनगर चेकनाका येथून सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास झाला. त्यानंतर ठाणे शहरातील इंदिरानगर वागळे इस्टेट, नितीन कंपनी, पाचपाखाडी मार्गे ही यात्रा मासुंदा तलाव येथे आली. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना आपले मनोगत व्यक्त केले.

 

ते पुढे म्हणाले की, मोदी हे जनताभिमुख कारभार करीत आहेत. त्यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या भाषणावरही देशातील तरुणाईने चांगले रँकींग दिले आहे. देशाची युवा पिढी, आणि जनता मोदींचे नेतृत्व मान्य करते. राजकारणाची दिशा वेगळी करण्यासाठी देशातील विरोधी पक्षनेते एकत्र येत आहेत. कितीही पक्ष एकत्र आले तरी २०२४ मध्ये मोदी हेच पंतप्रधान होतील, ही काळया दगडावरची रेघ आहे.

Team Global News Marathi: