निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसला भाजपने दिला आणखी एक धक्का

पश्चिमबंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये प्रमुख लढत होणार आहे. त्यात अनेक मतबल नेत्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यात आता भाजपाने ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का दिला आहे.

काही दिवसांपूर्वी ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपात प्रवेश केला होता. यावेळी मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली होती.आता त्या पाठोपाठ निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलच्या पाच आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे.

सोनाली गुहा आणि रवींद्रनाथ भट्टाचार्य यांना तृणमूल काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले जतू लाहिरी आणि माजी फुटबॉलपटू दीपेन्दू विश्वास यांनीही तृणमूल काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे शीतल सरदार या तृणमूल काँग्रेस आमदारानेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Team Global News Marathi: