कोरोनाकाळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं हे हत्याकांडच, नाना पटोलेंनी साधला मोदी सरकारवर निशाणा

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यापासून नाना पटोले हे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका करताना अनेकवेळा दिसून आले आहेत. त्यातच पुन्हा एकदा विदेशात पाठवण्यात आलेल्या लसीच्या मुद्द्यावरून पटोलेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोनामध्ये ज्यांचे मृत्यू झाले त्यांची जाहीर माफी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागावी. लसी दुसऱ्या देशांना पाठवून भारतीय जनता पक्षाने कोरोना काळात हत्याकांड घडविले, त्यांनी हे पाप केलं, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

कोरोना काळात एका एका कुटुंबातील अनेक लोकांचे जीव गेले. आर्थिक कमजोर झाले. यामुळे पंतप्रधांनी देशाची जाहीर मागावी ,अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तर हे जे कृत्य झाले ते म्हणजे जालियनवाला हत्याकांड प्रमाणे झाले आहे. यासाठी केंद्राची चुकी झाली आहे. भाजपने हे हत्याकांड घडविले असा घणाघात नाना पटोले यांनी केला.

Team Global News Marathi: