कोरोनाचा उद्रेक झालेल्या जिल्ह्यात दोन आठवड्यात लसीकरण पूर्ण करा केंद्राचे आदेश

नवी दिल्ली : महाराष्ट्रात करोनाने आपला डोकं पुन्हा एकदा वर काढला आहे. आज करोना संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. विशेष म्हणजे देशातील काही जिल्ह्यांत करोनाचा उद्रेक झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मान्य केले असून, या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्रासह काही राज्यात करोनाची दुसरी लाट आली आहे. चिंतेची बाब म्हणजे दुसऱ्या लाटेनं तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचे आतापर्यंतचे उच्चांक मोडीत काढला आहे. त्याचबरोबर इतरही ७ राज्यात करोना संसर्गाने डोकं वर काढल्यानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना करोना नियंत्रणासाठी कृती कार्यक्रम दिला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबद्दलची मंगळवारी माहिती दिली. ज्या जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. राज्य सरकारने त्या जिल्ह्यांमधील ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण दोन आठड्यात पूर्ण करावं. लसीकरण करताना ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिलं जावं. त्याचबरोबर करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २५ ते ३० जणांचा शोध घ्यावा, त्यांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून करोना रुग्णसंख्या कमी करण्यात यश येईल, असे केंद्राने म्हंटले आहे.

Team Global News Marathi: