Budget 2019 : जे 55 वर्षात झालं नाही ते आम्ही पाच वर्षात करुन दाखवलं-सीतारामण

Budget 2019 : जे 55 वर्षात झालं नाही ते आम्ही पाच वर्षात करुन दाखवलं-सीतारामण

भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था

पाच वर्षांपुर्वी भारतीय अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. मोदी सरकार-2 च्या पहिला अर्थसंकल्पात नेमकं काय काय असणार याकडे देशाचं लक्ष लागलं होत. अशातच बोलताना निर्मला सीतारामन यांनी एक ट्रिलयन डॉलर अर्थव्यवस्था होण्यास 55 वर्ष लागली, पण आम्ही फक्त पाच वर्षात एक ट्रिलियन डॉलर्स त्यात जोडले असल्याची माहिती दिली.

यावेळी निर्मला सीतारामन यांनी पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं उद्दिष्ट पुढच्या काही वर्षांमध्ये नक्की गाठू असा विश्वास व्यक्त केला. तसंच या वर्षातच तीन ट्रिलियन डॉलरचं लक्ष आपली अर्थव्यवस्था गाठेल असंही सांगितलं. पाच वर्षांपुर्वी भारतीय अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती. पण आता भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

गेल्या पाच वर्षात नव्या भारतासाठी आम्ही काम केलं, देशातील सर्वात शेवटच्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. भारतातील सर्व खासगी उद्योगांनी अर्थव्यवस्थेला वाढवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. आमचं सरकार परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या सूत्राने काम करत आहे. आता नव्या भारताचं स्वप्न सत्यात उतरेल असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: