संघाने साधला होता उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क, उद्धव ठाकरेंच्या दाव्याने खळबळ

मुंबई । संघाच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असून सरकार स्थापन करण्यासाठी भाजपशी या विषयावर चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी ही ऑफर फेटाळून लावली. 24 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचा निकाल रविवारी लागला होता.

भाजपा-शिवसेनेला एकत्र आणण्यासाठी संघाने अनेक वेळा पडद्यामागे प्रयत्न केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील ललित हॉटेलमध्ये आमदारांना सांगितले की, आरएसएस नेत्यांनी त्यांच्याकडे संपर्क साधला, परंतु त्यांनी भाजपला मैत्री करण्याची वेळ संपत असल्याने त्यांनी ही ऑफर नाकारली. सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी ललित हॉटेलमध्ये आपल्या आमदारांना संबोधित करतांना हा दावा केला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: