दरवेळी नवा फंडा काढून लोकांना फसवायचा विरोधकांचा प्रयत्न यंदा यशस्वी होणार नाही- विश्वास बारबोले

बार्शी:  दरवेळी नवा फंडाकडून लोकांना फसवावयाचा विरोधकांचा प्रयत्न असतो. मात्र सुशिक्षित लोक त्याला बळी पडणार नाहीत. विकास कामामुळे थोडा त्रास होत आहे. मात्र मतदारांच्या आशीर्वादामुळे राजाभाऊंचा विजय पक्का असल्याचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले म्हणाले.

आसिफ तांबोळी यांनी पालिकेतील विरोधकांची 10 वर्षे व आमची अडीच वर्षे याची तुलना करा. विरोधकांना जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. तुम्ही राजकारण करा पण राजकारणात जात-धर्म आणू नका, असे सांगितले. विकास कामाच्या जोरावर आमचा विजय निश्‍चित असल्याचे ते म्हणाले.  

विधानसभा निवडणुकीत जुना गांधी पुतळा येथे आयोजित प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, रमेश पाटील, संतोष निंबाळकर, अनिल डिसले, कपिल कोरके, विजय राऊत, बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, पांडुरंग गव्हाणे, प्रशांत कथले, शंकर वाघमारे, नवनाथ चांदणे, अ‍ॅड. वासुदेव ढगे, बाळासाहेब पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी व प्रमुख नेते मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.

अनिल डिसले, रमेश पाटील यांनी राजाभाऊ हे जनतेचे तिकीट घेवून उभे आहेत. तिकीटाची गरज विरोधकांना होती. मात्र आजवर शिवसेनेवर केलेली टीका शिवसैनिक कसे विसरतील, अशी टीका सोपल यांच्यावर केली. विजय राऊत यांनी विरोधकांचा कडक भाषेत समाचार घेत राजाभाऊ यांचा विजय निश्‍चित असून तुमचे प्रेम हेच आमची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
 यावेळी पांडुरंग गव्हाणे, कपिल कोरके, शंकर वाघमारे, सुनिल अवघडे, परशुराम डोबे, नवनाथ चांदणे आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी सकल मराठा समाज, धनगर, वंजारी, वडार समाज, वारकरी परिषद आदी विविध संघटनांनी राजाभाऊ राऊत यांना पाठिंबा जाहीर केला. सूत्रसंचालन व आभार केशव घोगरे यांनी मानले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: