केंद्रात मराठा आरक्षण कायदा करा अन्यथा मराठा समाज वंचित सोबत जाईल:हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | मराठा आरक्षणाबाबत केंद्रामध्ये कायदा पास करावा नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज वंचित बहुजन आघाडीसोबत जाईल, असं मत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केलं आहे.

मला निवडणुकीत 2 लाख 83 हजार मतं मिळाली. ही सर्व मतं मराठा समाजाची आहेत. त्यामुळे सरकारने मराठा समाजाचा असंतोष ओळखावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेना-भाजप सरकारने याबाबत ठोस निर्णय एका महिन्याच्या आत घ्यावा, नाहीतर मी लवकरच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहे, असंही ते म्हणाले आहेत.

admin: