काँग्रेस-राष्ट्रवादी चेआणखी 17 आमदार आमच्या संपर्कात-रावसाहेब दानवे

औरंगाबाद | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. आणि निवडणुका म्हटले की, आयाराम गयारामाची चलती असते. अनेक बडे नेते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हे प्रवेशाचे वारे काही थांबायला तयार नाही.

  दरम्यान आता काँग्रेस राष्ट्रवादीचे 17 आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, ते आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.

विधानसभा निवडणुकांना अवघे तीन महिने बाकी आहेत. त्यापूर्वीच भाजपने विरोधी पक्षातील आमदारांचा पक्षप्रवेशाचा धडाकाच लावला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीचे 17 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यासोबतच काँग्रेसचे दिग्गज नेतेदेखील भाजपत प्रवेशासाठी प्रतिक्षेत असल्याचे दानवे म्हणाले.. मात्र, सामाजिक समीकरण व राजकीय परिस्थिती विचारात घेऊन त्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार असे दानवे म्हणाले.

दानवे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना म्हणाले की, भाजपमध्ये सद्या सुरु असलेल्या इनकमिंगमुळे जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही. पक्षात कुणी आले तरी आपले काम एकनिष्ठेने सुरूच ठेवायचे असते. एक दिवस तुम्हाला नक्कीच तुम्हाला न्याय मिळत असतो असे दानवे म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: