आता गुलाल उधळायला मला साताऱ्यात बोलवा; शरद पवारांनी उदयनराजेंना ‘स्वाभिमाना’वरून पुन्हा डिवचलं


साताऱ्यात रॅली काढून पवार यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना स्वाभिमानावरून डिवचले आहे. शरद पवार यांना विधानसभा आणि लोकसभा जिंकून मला पुन्हा गुलाल उधळायला बोलवा असे म्हणत एकप्रकारे उदयनराजेंना पराभूत करण्याचा इशारा दिला.



रविवारी शरद पवार यांना शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपध्ये दाखल झालेल्या उदयनराजे यांच्या साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी उदयनराजेंवर स्वाभिमानावरूनही टीका केली

 ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्लीच्या दरबारात अपमान झाला. त्यानंतर राजे त्या दरबारातून निघून गेले आणि आता? मी एवढचं म्हणेन हे बरं नव्हं,’  असा भाजप नेते उदयनराजे भोसले यांना टोला लगावला. उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार आज, पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात आले होते. उदयनराजेंविषयी पवार काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण, भाषणात पवार यांनी उदयनराजे भोसले यांचा उल्लेख न करता त्यांना लक्ष्य केले. तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडून देण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

काय म्हणाले शरद पवार?

बाईक रॅलीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना साताऱ्यात मेळावा झाला. त्यात पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी संकटात आहे. पण, आजचे राज्यकर्ते दुष्काळ आणि महापुराच्या संकटाकडे बघायला तयार नाहीत. दुसरीकडं ज्या किल्ल्यांवर स्वाभिमानाचा इतिहास घडला तिथं हॉटेल आणि बार उभं करण्याचं नियोजन हे सरकार करत आहे. त्या जागांविषयी सरकारला आत्मियताच नाही. एकेकाळी पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना दिल्लीचे आमंत्रण दिले होते. दरबारात सन्मान होईल, असा शब्द त्यांनी दिला होता. पण, महाराज दिल्लीत गेल्यानंतर दरबारात त्यांना मागे बसवले. महाराज तेथून बाहेर पडले. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पण, राजे त्यातूनही सुटले आणि महाराष्ट्रात परत येऊन त्यांनी इतिहास घडवला.’ यानंतर आणि आता? असा प्रश्न विचारताच सभागृहात हशा पिकला. त्यावर ‘हे वागणं बरं नव्हं.’ असं म्हणत, पवार यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला.

‘मी चुकलो जयंतरावांचं ऐकलं नाही’

उदयनराजे भोसले यांचं नाव न घेता पवार यांनी जयंत पाटील यांचा सल्ला मी ऐकला नाही, अशी कबुली दिली ते म्हणाले, ‘जयंत पाटील यांचा सल्ला न ऐकण्याचं कारण एवढच होतं की, तुम्हाला आम्हाला या गादीचा अभिमान आहे. महाराष्ट्र धर्म ज्यांनी शिकवला त्यांची ही गादी आहे. त्यामुळं काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण, मी चुकलो. मला आता त्यावर फारसं बोलायचं नाही. कारण, वेगळा मार्ग  स्वीकारायचा हा त्यांचा अधिकार आहे.’

‘कोण म्हणतंय मी म्हातारा झालोय?’

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना आलेले अनुभव पवार यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले. ‘सध्या मी महाराष्ट्रात फिरत आहे. जाईल तिथं मी पाहतोय की, तरुणांन लाचारी पसंत नाही. हल्लीची राजवट पसंत नाही. सगळ्यांची अपेक्षा अशीच की, ताकद उभी केली पाहिजे. मला अनेक जण ८० वर्षांचा म्हणतात. कोणी वयस्कर झालेत म्हणतात. कुणी सांगितलं, मी वयस्कर झालो. काय पाहिलं तुम्ही माझ्यात? जर, १४-१६ काम करण्याची गरज असेल तर, २० तास काम करीन पण महाराष्ट्र चुकीच्या हातात जाऊ देणार नाही.’

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा इतिहास निर्माण केला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज दिल्लीला गेले. परंतु औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा योग्य सन्मान केला गेला नाही. महाराज तिथून परत आले. त्यामुळे त्यांना आग्र्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले. मात्र महाराजांनी परत येऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि आता…? असे म्हणत पवारांनी उदयनराजे यांना टोला लगावला.

पवार पुढे म्हणाले, मला जयंतराव सांगत होते, मी यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. पण मी त्यांचा सल्ला ऐकला नाही. कारण त्या गादीबद्दल मला आदर आहे. महाराष्ट्र धर्म ज्या गादीने शिकवला ती ही गादी आहे. यशवंतराव चव्हाण आणि क्रांतीसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा आहे. त्यामुळे कामाला लागा. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासह लोकसभा जिंका आणि मला गुलाल उधळायला बोलवा, असे आवाहन पवारांनी कार्यकर्त्यांना केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: