राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला आता सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शीतयुद्ध पेटले आहे. पहिल्या दीड तासात ५० टक्के मतदान पूर्ण झाले आहे. आथापर्यंत एकूण १४३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामधून भाजपाच्या ६०हून अधिक आमदारांनी मतदान केल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडीचे सर्व उमेवार निवडून येतील, असा विश्वास पुन्हा एकदा संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीत चुरस वगैरे काही नाही. विरोधकांकडून तसा भ्रम निर्माण केला जात असल्याचा दावाही राऊतांनी यावेळी केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा आहे, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1535133065043
आजच्या मतदानात आकडे स्पष्ट दिसतील, असं संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. महाविकास आघाडीकडील आकडे जास्त झाले तरी भाजपला धक्का बसू नये, अशी अपेक्षा आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर आता त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे संजय राऊतांनी भाजपाला पुन्हा एकदा डिवचलं आहे.