मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेच काम मुंबईच्या व्यावसायिकांना न दिल्यानं आक्रमक भूमिका घेतली होती. मनसे कार्यकर्त्यांनी ताज हॉटेलसमोर आयपीएलमधील खेळाडूंसाठी आणलेली बस फोडली असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे मुंबईत एकाच खळबळ उडाली होती.
दरम्यान,मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्याकडून परिवहन मंत्र्यांना तसेच आईपीएल व्यवस्थापनाला पत्र देऊन मागणी करण्यात आली होती की,’आयपीएल जर महाराष्ट्रात होत असेल आयपीएलची वाहतूक व्यवस्था स्थानिक कंपन्यांना कंत्राट देऊन करावी’ परंतु या मागणीवर कुठली प्रतिक्रिया आली नसल्यामुळे मनसे आक्रमक झाली.
महाराष्ट्रा मध्ये ipl चे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल तर प्रश्न हा आहे युवराजांनी हा सगळा पुढाकार स्वतःच अर्थ चक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्रच??
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 17, 2022
यातच,आयपीएलची बस फोडल्यानंतर मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे,’महाराष्ट्रामध्ये आयपीएलचे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल तर प्रश्न हा आहे युवराजांनी हा सगळा पुढाकार स्वतःच अर्थ चक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्रच?, हा आमचा प्रश्न आहे पर्यटनमंत्र्यांना.’ असा सवाल त्यांनी ठाकरे सरकला विचारला आहे.