राज्यात आघाडीचे सरकारं स्थापन झाल्यापासून भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे सत्ता महाविकास आघाडीच्या नेत्यावर आरोप लागवणं दिसून आले आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी एका वाक्यात सोमय्यांचा समाचार घेतला होता. किरीट सोमय्या यांना कोण किती गांभीर्याने घेते, हे आपल्याला माहिती आहेच. त्यामुळे ते काय बोलतात, त्याने फरक पडत नाही अशा एका वाक्यात त्यांनी समाचार घेतला.
राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची ईडीकडून होत असलेल्या चौकशीबद्दल विचारले असता ते म्हणाले, देशमुख यांना क्लीन चीट देण्यात आल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहेच. मात्र, तरीही त्यांना विनाकारण त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे हे घाणेरडे राजकारण सुरू आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी लगावला होता.
पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामात हस्तक्षेप करून चौकशा लावल्या जातात. आरोपांत तथ्य नसले तरी आघाडीच्या नेत्यांची समाजात बदनामी करणे हा त्यांचा उद्देश असतो. यासंबंधी नावांची यादी जाहीर करणारे किरीट सोमय्या यांना कोण किती गांभीर्याने घेते, हे आपल्याला माहिती आहेच. त्यामुळे ते काय बोलतात, त्याने फरक पडत नाही.