लोकसभा नि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी रास्तवराडी आणि काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यातच एका कार्यक्रमात पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मी भाजपमध्ये आल्यावर मला आता शांत झोप लागते, असे विधान केले होते. आता या विधानाचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
पुण्याच्या मावळमध्ये अल्पसंख्याक विभाग कार्यकर्ता मेळाव्यात नवाब मलिक बोलत होते. यावेळी मलिक म्हणाले की, हर्षवर्धन पाटील म्हणाले भाजपमध्ये गेलो म्हणून शांत झोप येते. फाटली होती म्हणून भाजपमध्ये गेले का? बरं आता गेले ते गेले. आमच्यावर यंत्रणांचा वापर केला तरी महाविकास आघाडी सरकारला काही फरक पडत नाही.
पण एक सांगतो आम्हाला शांत झोप येते आणि येणारच. पण तुमची झोप उडवून टाकू. पवार साहेबांनी जाणीवपूर्वक अल्पसंख्याक खातं हे माझ्याकडे दिलं. एक्साईज डिपार्टमेंट माझ्या दिलं जात होतं, पण ते मी नाकारलं. आमच्या धर्मात मद्यपानाला थारा नाही. रोज उठून तोच विषय समोर येणार, म्हणून मी हे खातं नाकारलं, असे मलिक म्हणाले.