सध्या राज्यात मनसुख हिरेन प्रकरण, देशमुख खंडणी प्रकरण चांगलेच गाजताना दिसत आहे. त्यात आता विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत संपूर्ण राज्यभरात आंदोलन छेडले आहे. त्यात आता काँग्रेसनेही पलटवार करत भाजपावर निशाणा साधला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं, अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाजी जगताप यांनी केली होती, आता या टीकेला अमृता फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, . ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बैंक / Axis बँके ‘ ला योग्यता पाहून दिली होती. लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.
अमृता फडणवीस या आघाडीतील पक्षांवर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही सातत्याने टीका करत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट टीका करायला त्या मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, त्यांच्या आताच्या ट्विटमधील भाषा नेहमीपेक्षा खूपच आक्रमक आहे. त्यामुळे आता भाई जगताप या ट्विटला काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.