नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमध्ये गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानाने हे स्पष्ट संकेत दिले की, भाजपकडून चांगली कामगिरी होत नाही असे चित्र निराम झाले आहे. अशातच या कारणसाठी समाजवादी पार्टी- राष्ट्रीय लोकदल युतीची भूमिका कमी स्वत: भाजपमधील अंतर्गत राजकारण जास्त जबाबदार आहे.
भाजप नेत्यांचे जास्त लक्ष सपा-रालोद युतीला पराभूत करण्याऐवजी पक्षातील आपल्या अंतर्गत शत्रूंना पराभूत करण्याकडे आहे. म्हणून गोरखपूरमध्ये ना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मार्ग सोपा आहे ना कौशांबीच्या सिराथू मतदारसंघात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा जिंकण्याचा मार्ग सोपा दिसून येत आहे.
भाजपमधील एक गट मौर्य यांच्याविरोधात उभ्या असलेल्या सपा युतीच्या पल्लवी पटेल यांना रसद पुरवत आहे तर दुसरा गट गोरखपूरमध्ये आदित्यनाथ यांच्याविरोधात काम करीत आहे. मतभेद आणि समन्वयाची टंचाई फक्त राज्यस्तरीय नेत्यांमध्येच आहे असे नाही तर केंद्रीय नेत्यांमध्येही ती आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे समर्थकही एक दुसऱ्याच्या विरोधात काम करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गद गटबाजीचा फटका येत्या निवडणुकीला बसताना दिसून येणार आहे.