नागपूर😐 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळाचा नारा देऊन महाविकास आघाडी सरकारमध्ये एकचं खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या विधानावर मुख्यामंत्री ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले होते. पटोले यांच्या विधानावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेतृत्वाकडे नाराजी दर्शवली होती.
तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार यांनी सुद्धा ‘काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी काही बोलल्या तर आम्ही भाष्य करू’ असे विधान करून नाव न घेता पटोले यांना टोला लगावला होता. आता यावर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना काँग्रेसकडून वारंवार होत असलेल्या स्वबळाच्या भाषेवर प्रश्न करण्यात आला.
म्हणाले म्हणले की, ‘आम्ही फक्त एच.के. पाटील काय म्हणतात त्याला महत्त्व देतो. कारण त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं’, अशा शब्दात नानांना टोला लगावला आहे. तसेच, ‘ज्यांना जे करायचंय त्यांनी ते करावं. कुणीच कुणाला बांधून ठेवलेलं नाही. आम्ही रोज रोज उत्तरं का द्यावीत?’ असा सवालही पटेलांनी केला होते.