Friday, August 19, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील”

by Team Global News Marathi
August 3, 2022
in राजकारण
0
“वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील”
ADVERTISEMENT

 

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये सुरु असलेली गळती आता थांबता थांबत नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाचवण्याचा मोठा पेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे. यातच आता ठाकरे पिता-पुत्र चांगलेच सक्रीय झाले असून, राज्यभरात दौरे काढले जात आहेत. यावरून भारतीय जनता पक्षाने टीका केली आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे. वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही. ज्यावेळेस आदित्य ठाकरे मंत्री होते व त्यांचे वडील मुख्यमंत्री होते त्यावेळेस जर आपण कोविड सारख्या भीषण संकटात सामान्य जनतेची, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची सुख-दु:ख व शिवसैनिकांच्या व्यथा समजून घेतल्या असत्या तर काही उपयोग झाला असता. परंतु आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

संजय राऊत यांनी शिवसेना सोडावी असे भाजपमधल्या कुठल्याही कार्यकर्त्याला, नेत्याला वाटत नाही. उलट त्यांच शिवसेनेत राहणचं योग्य आहे. ज्यावेळी राऊतांप्रमाणेच आनंदराव अडसूळ साहेबांवर ईडीची कारवाई झाली, तेव्हा एक ज्येष्ठ नेता विवंचनेत होता. त्यावेळेस त्यांची भेट घ्यावी असे उद्धव ठाकरेंना वाटले नाही.

तसेच यशवंत जाधव स्थायी समितीचे ३-४ वर्ष अध्यक्ष झाल्यानंतर ज्यांनी मातोश्रीचेच हित जपले त्यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यावर साधा एक फोनही आपण करु शकला नाहीत, अशी खंत व व्यथा त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी व्यक्त केली होती. मग आता एकदम संजय राऊतांचाच कळवळा का याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवे, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

संजय राऊत प्रकरणात ईडीची पुन्हा छापेमारी; गुरू आशिष कन्स्ट्रक्शनची कागदपत्रे जप्त

Next Post

समंथापासून वेगळे झाल्यावर नागा चैतन्यला झाली नव्या प्रेमाची जाणीव, 

Next Post
समंथापासून वेगळे झाल्यावर नागा चैतन्यला झाली नव्या प्रेमाची जाणीव, 

समंथापासून वेगळे झाल्यावर नागा चैतन्यला झाली नव्या प्रेमाची जाणीव, 

Recent Posts

  • “आता कसं वाटतंय…?”, फडणवीसांनी गोविंदांना विचारलं अन् हेही सांगितलं!
  • औरंगाबादचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात सामील ‘पक्षात सर्व अंबादास दानवेंना…..
  • शरद पवारांचे मार्गदर्शन घेणार, अब्दुल सत्तारांनी सांगितली रणनीती
  • १५०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात हसन मुश्रीफांच्या चौकशीसंदर्भात लोकायुक्तांद्वारे २४ऑगस्टला सुनावणी
  • शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group