पुणे | राष्ट्रवादीचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. दत्तात्रेय भरणे यांना आपल्या वक्तव्याबद्दल जरा देखील खेद असेल तर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
यावेळी त्यांना दत्तात्रेय भरणे यांच्यासंदर्भात पत्रकार माध्यमांनी विचारला असता नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, माणसाची बुद्धी आणि मन जागेवर नसलं की मनी वसे ते स्वप्नी दिसे तसं ते तोंडातून बाहेर येतं, असं दत्ता भरणे यांचं झालं आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली ते मंत्री म्हणून काम करत आहेत, त्यांच्या विषयी जर कुणी असं बोलत असेल तर ते अत्यंत अयोग्य आहे, असं त्या म्हटलं आहे.
शिवसेनेमध्ये सध्या दत्तात्रेय भरणे यांच्या वक्तव्याचे चांगलेच पडसाद उमटत आहेत. त्यातच नीलम गोऱ्हे यांनी थेट दत्तात्रेय भरणे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादी काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.