शिवसेनेचा दसरा मेळावा दणक्यात पार पडला होता. कोरोनाच्या संसंसर्गामुळे यावेळी सुद्धा माटुंगायच्या षण्मुखानंद हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. मात्र यावेळी सुद्धा अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रीय नेत्यांपासून ते राज्यातील नेत्यांवर टीकास्त्र सोडले. पण, पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची चक्क जाहिरातीची नक्कल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची खिल्ली उडवली.
दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर सभेतून आपण भाजपमध्ये आल्यापासून शांत झोप लागते, ना कोणती चौकशी ना, कुठे ईडीची नोटीस असं काहीही होत नाही, अशी कबुलीच हर्षवर्धन पाटील यांनी देऊन टाकली. त्यांच्या या विधानाचा समाचार घेत उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच खिल्ली उडवली.
हर्षवर्धन पाटील अनाहुतपणे बरोबर बोलून गेले. भाजपमध्ये गेल्यावर शांतपणे झोप येत आहे. ही लोक तिकडे ब्रँड अँबेसडर सारखी वागत आहे. टिव्हीवर जाहिराती येते ना,’ पहिले तो मुझे निंद की गोली खा के भी निंद नही आती ती थी, दरवाजे पर टक टक होती, तो भी निंद नही आती. फिर मुझे भाजप मैं जाने को कहा है, अब मैं कुंभकर्ण की तरह सो गया हुँ, टकटक किया तो भी उठता नही’ असं भाजपमध्ये गेलेल्या लोकांचं झालं आहे. अशा लायकीचे लोक आपल्याला धमक्या देत आहे. आमच्या अंगावर आला तर सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता.