स्थानिक ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे शनिवारी भारतीय जनता पक्षातार्फे राज्यभरात चक्काजाम अंदोलन पुरकरण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण संदर्भात मोठे विधान केले होते. जर ओबीसी आरक्षण मिळाले नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन असे विधान त्यांनी केले होते. आता त्यांच्या या विधानाचा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
फडणवीस एकटेच संन्यास घेणार आहेत की मोदीजींना ही सोबत नेणार आहेत? ओबीसी आरक्षणाचा बळी देण्यात दोघांचा वाटा आहे म्हणून विचारलं, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी लगावला आहे. लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचं नाव घेऊन मी पुन्हा येईनच सोंग करतंय, अशी टीका देखील रूपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस |
आमच्या हाती सूत्र द्या, मी ओबीसींचं आरक्षण परत आणून दाखवतो. जर असं करून दाखवलं नाही तर राजकीय संन्यास घेईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीसांवर टीका करण्यास सुरवात केली आहे.