एखाद्या चित्रपटासारखे राहिले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन; त्यांचा मृत्यू अजून बनलं आहे गुढ रहस्य

एखाद्या चित्रपटासारखे राहिले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन; त्यांचा मृत्यू अजून बनलं आहे गुढ रहस्य

 

 

नवी दिल्ली: स्वातंत्र्यसैनिक (Freedom fighter) नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांचे जीवन (life) संघर्षाची कथा असून सुभाषचंद्र बोस हे एक असे व्यक्ती होते की, त्यांच्या हातात जमीन फाडण्याची क्षमता होती; ज्यांनी आकाशात सुरक्षेची चर्चा केली; जे फुकटात काहीही स्वीकारत नसत आणि स्वातंत्र्यासाठी आपले रक्त सांडायला तयार राहत. नेताजी बोस यांच्या हाकेवर हजारो लोकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान (Sacrifice)दिले

लोकांसाठी प्रेरणा

नेताजींचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा येथे झाला, कोलकाता येथून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि भारतीय नागरी सेवा (ICS) अधिकारी बनून त्यांची योग्यता सिद्ध केली.  पण नोकरीमुळे आलेल्या सुख-सुविधा युक्त जीवन त्यांना नको होते. ते एक योद्धा होते ज्यांना स्वातंत्र्यलढा करावा लागला. त्यांनी स्वातंत्र्य चळवळ केवळ मनापासून स्वीकारली नाही तर ते स्वातंत्र्याचे प्रेरणास्थानही बनले.  “तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा” असा नारा देत देशाला जागवण्याची तयारी केली. त्यांच्या तत्वज्ञानाचा आणि व्यक्तिमत्वाचा असा करिष्मा होता की जो कोणी त्यांचे ऐकत असायचा तो त्यांच्याकडे आकर्षित व्हायचा. त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली आणि ते जनमानसात ‘नेताजी’ बनले.

नेताजी सुभाषचंद्र बोस हे महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित झाले होते आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. गांधीजींच्या सूचनेनुसार, त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली, ज्यांना त्यांनी नंतर त्यांचे राजकीय गुरू म्हणून स्वीकारले. लवकरच सुभाषचंद्र बोस यांनी नेतृत्वाची जाणीव दाखवत काँग्रेसमध्ये आपले स्थान निर्माण केले. त्या जोरावर त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले.  परंतु नंतर त्यांच्यात काही मतभेद झाल्याने सुभाषचंद्र बोस आणि चित्तरंजन दास हे वेगळे झाले.

सैन्यबळ तयार केलं

पुढे त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. ते भारतमातेशी इतके जोडलेले होते की गुलामगिरीच्या साखळीत जखडलेल्या त्यांच्या देशाने त्यांना शांततेत जगू दिले नाही. त्यांच्याबद्दल भारतातच नाही तर परदेशातही आकर्षण होते. 1933 पासून ते काही काळ युरोपात राहिले. वडिलांच्या मृत्यूनंतर ते परत आले तेव्हा त्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली. ऑस्ट्रियातील एमिलीशी लग्न करणाऱ्या सुभाषचंद्र बोसची प्रेम कहाणीही एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. भारताला स्वतंत्र करण्याच्या उद्देशाने, बोस यांनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी ‘आझाद हिंद सरकार’ची स्थापना केली, नंतर ‘आझाद हिंद फौज’ची स्थापना केली. 4 जुलै 1944 रोजी बर्मामध्ये आले. “मला रक्त द्या, आणि मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन” असे प्रसिद्ध शब्द त्यांनी त्या ठिकाणी उद्गगारले.

मृत्यू देखील एक रहस्य आहे

नेताजींचा मृत्यू आजही एक गूढच आहे. सरकारी कागदपत्रांनुसार, सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात झाला होता.

सुभाषचंद्र बोस ज्या विमानाने मंचुरियाला जात होते ते विमान वाटेतच बेपत्ता झाले आणि नंतर असे सांगण्यात आले की ते विमान तैवानमध्ये क्रॅश झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. मात्र, नेताजींचा मृत्यू झाला की त्यांची हत्या झाली, हे गूढ आजही कायम आहे. किंबहुना, हे गूढ आणखी वाढले कारण जपान सरकारने नंतर सांगितले की त्या दिवशी तैवानमध्ये विमान अपघात झाला नाही. अपघातच झाला नसेल तर मृत्यू कसा झाला, असा प्रश्न अशा परिस्थितीतून उपस्थित होत आहे.

2015 मध्ये, जेव्हा सर्व सरकारने या संदर्भात दोन फाईल्स सार्वजनिक केल्या, तेव्हा कळले की आयबीने दोन दशके त्यांची हेरगिरी केली होती.  दरम्यान अशा काही कागदपत्रे समोर आली ज्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूविषयी उल्लेख होता. परंतु नेताजी बोस यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला असा अहवाल किंवा उल्लेख आढळला नाही.  त्यानंतर काही लोक असेही मानत होते की, नेताजी बोस हे ह्यात आहेत, परंतु तसा कोणताच पुरावा हाती आलेला नाही.

साभार टाइम्स नाऊ मराठी

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: