गड आला पण…; नंदीग्राममधून ममतादीदी पराभूत, सुवेंद्र अधिकारी 1622 मतांची विजयी
पश्चिम बंगाल, 02 मे : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आपला गड राखत भाजपला धूळ चारली आहे. पण, नंदीग्राम मतदारसंघातून ममतादीदींना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीला ममतादीदी जिंकल्या असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण, परत फेरमतमोजणी केल्यानंतर भाजपचे उमेदवार सुवेंद्र अधिकारी विजयी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. तृणमूल काँग्रेसने एकहाती सत्ता राखत 218 जागांवर आघाडीवर आहे. अजूनही मतमोजणी सुरू आहे. 148 जागांवर तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात भाजपकडून सुवेंद्र अधिकारी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासून अधिकारी हे आघाडीवर होते. मात्र, संध्याकाळी अचानक चित्र पालटले आणि ममतादीदींनी आघाडी घेतली. 1200 मतांनी ममतादीदींना विजयी घोषित करण्यात आले होते. ममतादीदी विजयी झाल्यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते.
I accept the verdict. But I will move the Court because I have information that after the declaration of results there were some manipulations done and I will reveal those: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/JM88edOgAa
— ANI (@ANI) May 2, 2021
पण सुवेंद्र अधिकारी यांनी फेरमतमोजणीची विनंती केली. त्यानंतर निकालाचे चित्रच पालटले. सुवेंद्र अधिकारी हे 1622 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.