तालिबान संघटनेकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘माफी’ देण्याची घोषणा |

 

तालिबान संघटनेने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये कामावर परतण्याचे आदेश दिले आहेत. तालिबानने मंगळवारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ‘आम माफी’ जाहीर केली. तालिबानने निवेदनात म्हटले आहे की, ‘सर्वांसाठी माफीची घोषणा केली जात आहे … अशा स्थितीत आपण पूर्ण विश्वासाने आपली जबाबदारी पुन्हा सांभाळू   शकता. ‘कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला घाबरण्याची गरज नाही,’ असे तालिबानने म्हटले आहे.

 

अफगाणिस्तान पूर्णपणे ताब्यात घेतल्यानंतर तेथे तालिबान बाबतची भीती दिसून येते आहे. देश सोडून जाण्यासाठी विमानतळापासून सर्वत्र चेंगराचेंगरी झाली आहे. तालिबानच्या भीतीने पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांचा गणवेश उतरवला आहे. घरे सोडल्यानंतर ते अंडरग्राउंड झाले आहेत. तालिबानने कर्मचारी, पोलीस आणि लष्करी अधिकारी, पत्रकार आणि परदेशी स्वयंसेवी संस्थांशी संबंधित लोकांचा डोर-टु-डोर सर्च सुरू केला आहे.

शरिया कायदा लागू करून तालिबानला अफगाणिस्तानला इस्लामी अमीरात बनवायचे आहे. तालिबानने म्हटले आहे की,आमची संघटना लवकरच अफगाणिस्तानला इस्लामी अमीरात बनवण्याची घोषणा काबुलमधील अध्यक्षीय संकुलातून करेल. सत्ता हस्तांतरणासाठी समन्वय परिषद स्थापन करण्यात आली आहे. आज परिषदेचे सदस्य तालिबान नेत्यांशी चर्चा करतील.’

Team Global News Marathi: