शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल! विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!!
शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल! विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!! >> संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिलखुलास, सडेतोड मुलाखतीची देशभरात वादळी चर्चा सुरू आहे. मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ‘ठाकरे’ यांनी अत्यंत व्यथितमनाने सांगितले, ‘‘ज्यांना मी आपले मानले, तीच माणसंसोडून गेली. म्हणजेच ती माणसं कधीच आपली नव्हती. त्यांच्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही.’’ उद्धव ठाकरेयांनी आणखी एक सत्य सांगितलं, ‘‘भाजपात आजबाहेरून आलेल्यांनाच सर्वकाही दिलं जातंय. मुख्यमंत्रीपदापासून विरोधी पक्षनेते पदापर्यंत.’’ उद्धवठाकरे यांनी स्पष्टच सांगितले, ‘‘महाविकास आघाडीचाप्रयोग चुकला नाही. लोकांनी स्वागतच केले. ‘वर्षा’ सोडूनजाताना महाराष्ट्रात अनेकांनी अश्रू ढाळले. कोणत्यामुख्यमंत्र्यांना असे प्रेम मिळाले? त्या अश्रूंचे मोल मी वायाजाऊ देणार नाही!’’ उद्धव ठाकरे यांनी देशातील लोकशाहीचे भवितव्य, विरोधी पक्षांना खतम करण्यासाठी सुरू असलेला ‘ईडी’, ‘सीबीआय’चा गैरवापर यावर आसूड ओढले व अत्यंतज्वलंत भाषेत जाहीर केलं, ‘‘दिल्लीवाल्यांना शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा झगडा लावून महाराष्ट्रात मराठीमाणसांकडून मराठी माणसांचीच डोकी फोडायचीआहेत!’’ विरोधी ...