बिहार निवडणुकीत यश आणि श्रेय देवेंद्र फडवणवीस यांच्यामुळेच – प्रसाद लाड

बिहार निवडणुकीत यश आणि श्रेय देवेंद्र फडवणवीस यांच्यामुळेच – प्रसाद लाड

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासातच स्पष्ठ होणार आहे. त्यात मजमोजणी प्रक्रियेकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. एनडीए की महागठबंधं यात कोण बाजी मारणार हे अवघ्या काही तासातच समोर येईल. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच यश आणि विजयाचे श्रेय भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

एक्झिट पोलमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएचा धुव्वा उडाल्याचं चित्र दाखवलं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात वातावरण असल्याचं दाखवलं. मात्र बिहारमधील जनतेने भाजपवर, पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला” अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी एका मराठी वृत्त वहिनीला दिलेली आहे.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं. त्यामुळे हे देवेंद्र फडणवीस यांचंही यश आणि विजय आहे. काही तासातच एनडीए १३० च्या वर जाईल आणि महागठबंधन १०० च्या खाली येईल” असा विश्वासही यावेळी प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: