मुंबई | पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले असून, रविवारी सकाळी ७ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापेमारी केली. तसेच चौकशीसाठी सहकार्य करत नसल्यामुळे त्यांना ईडीने ताब्यात घेतले. . त्यावेळी संजय राऊत यांनी आपल्या अनोख्या शैलीत निवासस्थानाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना अभिवादन केले.
अटक झाल्यानंतर घरातून बाहेर पडल्यानंतर गळ्यातील भगवा गमछा काढून त्यांनी हवेत फिरवला. तसेच घराबाहेरील रस्त्यावरून ईडी कार्यालयात जाताना देखील संजय राऊत यांनी कारच्या सनरुफमधून बाहेर येऊन शिवसैनिक आणि समर्थकांना हात दाखवून आणि पुन्हा गळ्यातील भगवा गमछा फिरवून अभिवादन केले. यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे.
“भगवा हा सोयीचा विषय नाही की तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वापरावा, नसेल तेव्हा काढून ठेवावा” असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “भगवा हा सोयीचा विषय नाही की तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वापरावा, नसेल तेव्हा काढून ठेवावा” असं म्हटलं आहे. तसेच यासोबतच दोन फोटो देखील शेअर केले आहेत. सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता आणि अटक होताना भगवा गळ्यात कशाला? असं त्या फोटोंवर लिहिलं आहे.
“संजय राऊतांची अटक हे मोठं कारस्थान; महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न”
महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, केवळ भाजप राहणार; जे पी नड्डा यांचे मोठे विधान