नवी दिल्ली | सध्या संपूर्ण देशात कोरोना सर्गाने हाहाकार माजलेला असताना दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आवाढव्य वाढ झालेली दिसून येत आहे. त्यातच वाढत्या किमतीमुळे सामान्य नागरिकांना याचा फटका बसताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार विरोधात आता नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याचं पार्श्वभूमीवर आता मध्यप्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्नसिंग तोमर अजब वक्तव्य केले आहे.
ते एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘मंडईत भाजी आणायला जाताना सायकल वापरा. त्याने प्रकृतीही उत्तम राहील व प्रदूषणही होणार नाही. तेल दरवाढीतून जो पैसा मिळणार आहे, त्यातून गरीब लोकांना दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे. ‘ त्यांचा या सल्ल्यामुळे सध्या ते चर्चेत आले असून त्यांच्यावर सोशलवर टीका होत आहे.
मोदींच्या केंद्र सरकारने महागाईने व इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे व गृहिणींचे बजेट कोलमडून टाकले आहे. जगावं की मरावं या प्रश्नाचे उत्तर ‘मन की बात’मध्ये दिसते त्यावेळी ते ‘मरावंच’ असं दिसतं असं म्हणत विरोधी पक्षातील नेत्यांकडून मोदी सरकारवर हल्ला बोल होत आहे. मात्र दुसरीकडे भाजपा नेते अजब विधान करून आपल्या पक्षाच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहे.