राज्यात आघडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आघाडीच्या अनेक मंत्री, खासदार आणि आमदारांच्या घोटाळ्याचे प्रकरणं बाहेर काढले होते. त्यामुळं मिळत असलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावर आता किरीट सोमय्या यांनी भाष्य केले आहे. ते आज ठाणे आयुक्त कार्यालयात पत्रकार माध्यमांशी बोलत होते.
ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र, हे मंत्री कोण आहेत? आणि कोणत्या भाईंची मदत घेत आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. सोमय्या आज ठाणे मनपा आयुक्तांना भेटण्यासाठी आलेले असताना हे विधान केले आहे.
सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकारला ठिकाण्यावर आणण्याचे काम मी करत आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांची झोपमोड झाली आहे. काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहे, असं सांगतानाच वाशीममध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्यात भावना गवळींचे काही भाई लोक होते. तसं रिपोर्टमध्येही आलं आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या गृह मंत्र्यांनी मला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.