Sunday, March 26, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

by Team Global News Marathi
February 3, 2023
in राजकारण
0
शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

 

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालासाठी काल पार पडलेल्या मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर पाचव्या फेरीअखेर सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला. पण शुभांगी पाटील यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवूनही तब्बल ४० हजार मते मिळवली. मात्र या पराभवाला खचून न जाता यापुढेही झाशीच्या राणीसारखे लढणार असल्याचे म्हणत शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कधीच साथ सोडणार नसल्याचे शुभांगी पाटील यांनी म्हटले आहे.

मात्र आता एक नवी माहिती पुढे आली आहे. पराभव झाला असला तरी आपण डगमगणार नाही. पक्षप्रमुखांची आणि शिवसेनेची साथ कधीच सोडणार नाही हे दाखवून देण्यासाठी त्या लवकरच उद्धव ठाकरेंची मुंबई येथे भेट घेणार आहे. याबाबत त्यांनी खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केली असून उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली आहे. सध्या राजधानी दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने संजय राऊत दिल्लीत आहेत. त्यामुळे आज शुभांगी पाटील यांची उद्धव ठाकरेंसोबत भेट होणार नाही.

मात्र उद्या शनिवार आणि परवा रविवार असल्याने संसदेच्या कामकाजाला सुटी असणार आहे. त्यामुळे संजय राऊत आज रात्री मुंबईत येण्याची शक्यता आहे. उद्या किंवा परवा शुभांगी पाटील आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. झालेल्या पराभवानंतर शुभांगी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्यासारख्या सामान्य घरातील लेकीने ४० हजार मते मिळवणे ही एक मोठी बाब आहे. आतापर्यंत माझ्या कुटुंबातील एकही व्यक्ती सरपंचदेखील झालेली नाही. आणि अशा कुटुंबातील लेकीला पाच जिल्ह्यांतून ४० हजार मते मिळत असतील तर ते जनतेचे आभार आहेत. मी शिवसैनिकांचे आभार मानते, महाविकास आघाडीचे आभार मानते. पराभव झाला असला तरी यापुढेही झाशीच्या राणीसारखे लढायचे आहे.

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Recent Posts

  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे
  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा बार्शीत गुन्हा दाखल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group