शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आता शिंदेंच्या बंडाच्या कहाणीबाबत अनेक गौयस्फोट समोर येत आहेत. शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून याबाबत अनेक गोष्टींचा उलघडा होताना दिसतोय. तर दुसरीकडे सध्या शिंदे गट आणि संजय राऊत यांच्यात मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शिंदे गटाकडून वारंवार संजय राऊतांना टार्गेट केले जातेय. त्यातच आता शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधलाय.
किशोर पाटील कि, गुवाहाटीचा प्रवास हा आख्या भारताला समजला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाचे पालन करत गाडी बसलो आणि सुखरूप मुंबईला पोहचलो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पहिजेच हा चंग बांधूंन आम्ही गेलो होतो. तो चंग आम्ही पूर्ण केला. आम्ही आमच्या आयुष्याचे ४० वर्ष शिवसेनेसाठी घालवले. शिवसेनेच्या कोणत्या ही आमदाराला निधी मिळाला नाही, असाही ते म्हणाले.
तसेच सकाळी नऊ वाजता रॉकेल ची कॅन आणि माचिस ची कडी घेऊन यायचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला पेटवयच आणि सगळ्या मीडियानी ते विजवयच येवढाच काम संजय राऊत साहेबांचं यांचे चालू आहे. संजय राऊत साहेबांच्या इतकं नॉलेज असलेलं माणूस नाही आहे. शिवसेना संपवायची वेळ आली याचं मुख्य कारण हे संजय राऊत आहेत. ही वेळ भाजप ल भविष्यात आणू द्यायची नसेल तर किरीट सोमय्या सारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या माणसाला समज दिली पाहिजे. आपली लेव्हल बघून आणि आपण कोणाला बोलतो हे बघून सोमय्या यांनी बोलावं, असं वक्तव्य पाटलांनी केलं आहे.
शेतकऱ्यांनो पावसाळ्यात ‘या’ भाज्यांची लागवड करा, मिळेल बंपर उत्पादन व नफा
इंदौरहून अमळनेरकडे येणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळली; एकूण १३ प्रवाशांचा मृत्यू