शिवसेनेचा भारत बंदला पाठिंबा, नागरिकांनी स्व-इच्छेने सहभागी व्हावे – राऊत

शिवसेनेचा भारत बंदला पाठिंबा, नागरिकांनी स्व-इच्छेने सहभागी व्हावे – राऊत

ग्लोबल न्यूज: दिल्लीत सुरु असलेले शेतकरी आंदोलन आता वेगळ्या वळणावर पोहचले आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत सरकार या कायद्याबाबत काही त्रुटी राहिल्याचे मान्य करताना दिसते. त्यामुळे आता नेमका कुठल्या गोष्टीबाबत तह किंवा तडजोड होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत आहे. कॉंग्रेस,राष्ट्रवादीसह राज्यमंत्री बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेने देखील या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीनेही या बंदला पाठिंबा दर्शवला असून नागरिकांनी बळीराजासाठी आंदोलनात सहभागी व्हावे, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जनतेला केले आहे. तसंच, हे काही राजकीय आंदोलन नाही म्हणून शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असंही राऊत म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: