आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस सरकारने मोठा निर्णय घेतला असून जानेवारी ते एप्रिल या काळात माध्यान्ह भोजनात चिकन आणि हंगामी फळे देण्याची तयारी सरकारने केली आहे. यासाठी ३७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, प्रधानमंत्री पोषण योजनेअंतर्गत सध्या माध्यान्ह भोजनात तांदूळ, बटाटा, सोयाबीन आणि अंडी दिली जात आहेत. आता यासोबतच चिकन आणि फळेही दर आठवड्याला दिली जाणार आहेत.पुढील चार महिन्यांसाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे.
ही तरतूद एप्रिलनंतरही सुरू राहणार की नाही, याचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे शाळा विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 3 जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, प्रत्येक विद्यार्थ्याला अतिरिक्त पोषण देण्यासाठी दर आठवड्याला 20 रुपये खर्च केले जातील. ही प्रक्रिया 16 आठवडे चालेल. सरकारी आणि अनुदानित शाळांमधील १.१६ कोटींहून अधिक विद्यार्थी माध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेतात. यावरील 60 टक्के खर्च राज्य सरकार आणि उर्वरित 40 टक्के केंद्र सरकार करते.
भाजप नेते राहुल सिन्हा म्हणाले की निवडणुकीपूर्वी शाळकरी मुलांना चिकन देण्याचा निर्णय टीएमसी सरकारच्या हृदयपरिवर्तनावर प्रश्न उपस्थित करतो. गरीब मुलांना या वस्तूंपासून वंचित ठेवून फक्त तांदूळ आणि डाळ का देण्यात आली? पंचायत निवडणुका तोंडावर आल्याने, या निर्णयामुळे मते मिळवण्याच्या राजकीय हेतूला तडा जातो.अशी टीका करत भारतीय जनता पक्षाने सवाल उपस्थित करत घणाघाती टीका तृणमूल सरकारवर केली आहे.