मुंबई | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ४० आमदार, १२ खासदार यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेला बळकटी देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा काढली आहे. आता तेजस ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री होणार का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी या विषयावर भाष्य केले आहे. प्रधान म्हणाले की, शिवसेना पक्ष म्हणून काम करतेय, कुणी कितीही दावे केले तरी त्याचा फरक पडत नाही.
शिवसेना आजही, उद्याही आणि भविष्यातही काम करत राहणार आहे. शिवसेनेत घडत असलेल्या घडामोडीमुळे ठाकरे कुटुंब मनातून दुखावले गेले आहे. तरीही उद्धव ठाकरे कणखर आहेत, रश्मी ठाकरे त्यांच्या पाठिशी ठाम आहेत, आदित्य, तेजसही पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत आहेत असं त्यांनी सांगितले तसेच तेजस ठाकरे यांनी राजकारणात यावं ही कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे, पण हा ठाकरे कुटुंबाचा प्रश्न आहे. सगळ्यांनी राजकारणात येण्यापेक्षा राजकीय व्यवस्थेला ताकदवान बनवून ती शिस्तबद्ध चालवणं हे जास्त गरजेचे आहे असं ते म्हणाले.
शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात, यासारखे दुर्देव काय?
मराठी भाषेतील पाट्यांबाबत सुप्रीम कोर्टाची राज्य सरकार तसेच मुंबई मनपाला नोटिस