मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यायेवेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अष्टक चव्हाण सुद्धा बरोबर होते. या भेटीत त्यांनी मोदींशी बंद दाराआडही चर्चा केली. रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोदी-ठाकरे भेटीवर मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बॅक टू पॅव्हेलियन यावं. भाजपासोबत सत्ता स्थापन करावी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं असं विधान आठवले यांनी केले आहे.
रामदास आठवले यांनी मराठाच्या माध्यमांशी संवाद साधला होते यावेळी त्यांनी हे विधान केले होते. उद्धव ठाकरेंना माझा प्रस्ताव आहे. त्यांनी बॅक टू पव्हेलियन यावं. भाजपसोबत सरकार स्थापन करावं. शिवसेना, भाजप आणि आरपीआयची युती महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारी आहे, असं आठवले म्हणाले. शिवसेना आणि भाजपची ३० वर्षांपासूनची मैत्री होती. उद्धव ठाकरे यांनी या मैत्रीचा विचार करावा. भाजपसोबत यावं आणि मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची काल भेट झाली. या भेटीमधून राज्याला बऱ्याच अपेक्षा आहेत, असं ते म्हणाले.
आज रामदास आठवले यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी रिपाइं नेते अविनाश महातेकरही त्यांच्यासोबत होते. ही अनौपचारिक भेट होती. या भेटीत मराठा, ओबीसी, मुस्लिम आणि धनगर आरक्षणावर चर्चा झाली. तसेच देशभरातील क्षत्रियांनाही आरक्षण मिळावं याबाबतही चर्चा करण्यात आली.