Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

सत्ता गेल्यावर राऊत-खैरे रिकामटेकडे, प्रसिद्धीसाठी काहीही बडबडतात

by Team Global News Marathi
December 2, 2022
in मुंबई
0
सत्ता गेल्यावर राऊत-खैरे रिकामटेकडे, प्रसिद्धीसाठी काहीही बडबडतात

 

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यामुळे या दोन्ही गटातील वाद टोकाला गेला आहे. त्यातच पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले संजय राऊत यांना तब्बल १०३ दिवसानंतर जामीन मंजूर झाल्यापासून ते सतत शिंदे गटाला लक्ष्य करत आहेत. त्यातच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर टीका केल्यापासून त्यांच्यावरही जोरदार टीका केली जात आहे.

अशातच शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनीही चंद्रकांत खैर आणि संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीकास्त्र सोडले आहे. सत्ता गेल्यानंतर आता संजय राऊत आणि चंद्रकांत खैरे यांना कुठलेही काम नाही. त्यामुळे प्रसिद्धीच्या लालसेपोटी काहीही विधाने ते करत असतात. सत्ता गेल्याने चंद्रकांत खैरे असोत की राऊत यांना बडबड करण्याव्यतिरिक्त कुठलेही काम उरलेले नाही. सध्याच्या राजकारणात चर्चेत राहण्यासाठी आणि माध्यमांमध्ये झळकण्यासाठी ते काहीही विधाने करत असतात, त्यामुळे ते दररोज सकाळी उठल्याबरोबर माध्यमांसमोर बोलत असतात, असा चिमटा त्यांनी काढाला.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतरही अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. त्यावर बोलताना संजय शिरसाठ म्हणाले, आता उद्धव ठाकरे गटाचा पक्ष शेवटची घटका मोजत आहे. उद्धव ठाकरे यांचे आपल्याच पक्षावर कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही.शिंदे गटाने बंडखोरी केल्यापासून खोके सरकार असल्याचा आरोप केला जात आहे. शिंदे गटावर पैसे घेतले असल्याचाही आरोप केला जात आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
ग्लोबल वॉर्मिग घातक,12 शहरं जाणार पाण्याखाली

ग्लोबल वॉर्मिग घातक,12 शहरं जाणार पाण्याखाली

Recent Posts

  • यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल
  • २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय
  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group