मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणी भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ या आक्रमक झाल्या होत्या.
पुढे विरोधकांचा दबावापुढे आघाडी सरकारने नमते घेत संजय राठोड यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडले होते. मात्र अद्याप संजय राठोड मंत्री पदावर कायम असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
त्या म्हणाल्या की, 3 दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. मात्र, संजय राठोड हे अद्यापही मंत्रिपदावर आहेत कारण, राठोड यांनी राजीनामा दिला असला तर तो मुख्यमंत्र्यांनी अद्याप राज्यपालांकडे पाठवला नाही, असे चित्रा वाघ यांनी बोलून दाखविले,
मा. मुख्यमंत्रीजी, संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन 3 दिवस झाले पण तो राज्यपालांकडे पाठवलेला नाही. राजीनामा राज्यपालांकडे जाऊन मंजूर होत नाही तोवर संजय राठोड आजही मंत्री आहेत. ही राज्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणं आहे. या संदर्भात “वाण नाही पण गुण लागला” हे तुमच्याबाबत होऊ देऊ नका असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
मा.मुख्यमंत्री जी
संजय राठोड चा राजीनामा घेऊन ३ दिवस झाले पण तो राज्यपालांकडे पाठवलेला नाही
राजीनामा राज्यपालांकडे जाऊन मंजूर होत नाही तोवर संजय राठोड आज ही मंत्री आहेचं..ही राज्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे झाले
या संदर्भात”वाण नाही पण गुण लागला”हे तुमच्याबाबतीत होऊ देऊ नका pic.twitter.com/copfCeWEKn— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 3, 2021