Monday, March 27, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

सगळे प्रकल्प गुजरातला, महाराष्ट्रातील युवकांनी आरत्या, हनुमान चालीसा पठण करा – छगन भुजबळ

by Team Global News Marathi
October 28, 2022
in महाराष्ट्र
0
सगळे प्रकल्प गुजरातला, महाराष्ट्रातील युवकांनी आरत्या, हनुमान चालीसा पठण करा – छगन भुजबळ

 

महाराष्ट्र राज्यातून एका पाठोपाठ एक उद्योग प्रकल्प गुजरातला जात आहेत. मात्र अशा प्रकल्प पळवापळवीमुळे राज्यातील युवकांचा रोजगार हिसकावला जात आहे.त्यामुळे राज्यातील युवकांनी आता करायचे काय तर? आरत्या करा, हनुमान चालीसा पठण करा दहीहंडी फोडा, फटाके फोडा अशी यादीच छगन भुजबळ यांनी सुचवली आहे.

आज सकाळपासून एअर बस संदर्भात टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दुसरा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू झाली आहे. अशातच माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरले असून फडणविस याबाबत लक्ष घालून महाराष्ट्रातील प्रकल्प राज्यातच होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत एअर बसचा प्रकल्प याबाबत आपणही पाठपुरावा केल्याचे सांगत भूमिका मांडली. ते म्हणाले. एअर बस प्रकल्प हा 22 हजार कोटी ची गुंतवणूक असून पुढे वाढणार आहे. मागील वर्षी भारताने या कंपनीशी करार केला. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2021 ला मी स्वतः रतन टाटा याना पत्र पाठवले. हा प्रकल्प नाशिकच्या ओझर येथील H AL कारखान्यात तयार करा अशी मागणी केली होती. मात्र महाविकास सरकारच्या काळात आमच्याकडे अन्न पुरवठा पुरवठा खाते असल्याने, शिवाय कोरोना आल्यानंतर हा विषय बाजूला पडला. मी पत्र दिले मात्र त्याला उत्तर आले नसल्याचा निर्वाळा भुजबळांनी यावेळी दिला.

ते पुढे म्हणाले, एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरात ला जात आहेत. महाराष्ट्र मधील युवकांनी काय करायचे? आरत्या करा, हनुमान चाळीसा पठण करा, दहीहंडी खेळा असा जाब सल्ला यावेळी त्यांनी दिला. सरकार कोणाचे असो फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या शब्दाला दिल्लीत वजन आहेत. एकनाथ शिंदे करू शकणार नाही, पण देवेंद्र करू शकले असते. मोदींनी देशाचे नेते म्हणून वागले पाहिजे, गुजरातचा विकास आधीच घडला असे म्हणतात मग आता प्रकल्प नेण्याची गरज काय? दिल्लीत जे नेते काम करत आहेत, त्यांनी लक्ष घातले पाहिजे होते. आता आम्ही प्रयत्न केले तरीही झालेला निर्णय मागे घेतला जाईल का याबाबत साशंकता असल्याचे म्हणाले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
एसआरए घोटाळाप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू

एसआरए घोटाळाप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group