नागपूर | भारतीय जनता पक्ष शिवसेनेला मिळालेला जनादेश फसवून पळविण्यात आला. गेल्या अडीच वर्षांत काही झाले नाही. शिंदे अस्वस्थ होते, त्यांनी मविआ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्या आमदारांना कळत नव्हते की लोकांकडे जाऊन उद्या काय तोंड दाखविणार?कशाच्या आधारावर मते मागणार? ज्या हिंदुत्वावर पक्ष उभा राहिला, त्यावर बोलूही शकत नाही, यामुळे शिवसेनेमध्ये आमदारांनी उठाव केल्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपावर आरोप होत होते, की आम्ही हे सारे सत्तेसाठी करत आहोत. सत्तेला हपापलेले आहोत. परंतू पक्षाने आपण सत्तेला हपापलेले नाही, हा संदेश एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून दिला आहे. सरकार बाहेर बसून सरकार चालविता येत नाही, यामुळे नड्डा, शहा यांनी मला फोन करून सत्तेत सहभागी होण्यास सांगितले. म्हणून मी उप मुख्यमंत्री झालो. पक्षाने त्य़ा दिवशी घरी जा असे जरी सांगितले असते, तरी मी निमूटपणे घरी आलो असतो, असे फडणवीस म्हणाले.
आता मी एकनाथ शिंदे यांना यशस्वी मुख्यमंत्री करण्यासाठी झटणार आहे. त्यांच्यात तेवढी ताकद आहे. राज्याच विकास मविआने थांबविला होता. मोदी सरकारने त्यांना पाणी पाजले आहे. आज त्यांच्या पक्षाची अवस्था काय झालीय हे तुम्ही पाहताय. भाजपा नेतृत्वाने चांगला निर्णय घेतला, असे फडणवीस म्हणाले.