दिलासादायक:राज्यात आज 65,934 जणांना डिस्चार्ज तर 51880 नवे रुग्ण 15 जिल्ह्यात रुग्णांची घट
ग्लोबल न्यूज – राज्यात आज नव्यानं वाढ झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज 65 हजार 934 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिकसह पंधरा जिल्ह्यात रुग्ण संख्येत घट झाल्याचे आरोग्य राजेश टोपे यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारीनुसार, राज्यात आज 51 हजार 880 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 48 लाख 22 हजार 902 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 41 लाख 07 हजार 092 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 41 हजार 910 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात आज 51880 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 65934 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 4107092 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 641910 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.16% झाले आहे.#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 4, 2021
आज 891 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आजवर एकूण 71 हजार 742 जण कोरोनामुळे मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.49 टक्के एवढा, तर रिकव्हरी रेट 85.16 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट देशाच्या रिकव्हरी रेट पेक्षा अधिक आहे.
सध्या राज्यात 39 लाख 36 हजार 323 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 30 हजार 356 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 81 लाख 05 हजार 382 नमूने तपासण्यात आले आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५१,८८० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४८,२२,९०२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका २५५४
२ ठाणे ७३२
३ ठाणे मनपा ५६५
४ नवी मुंबई मनपा ३६६
५ कल्याण डोंबवली मनपा ५८८
६ उल्हासनगर मनपा ७१
७ भिवंडी निजामपूर मनपा २६
८ मीरा भाईंदर मनपा २५६
९ पालघर ५२५
१० वसईविरार मनपा ४९९
११ रायगड ९१५
१२ पनवेल मनपा ३३९
ठाणे मंडळ एकूण ७४३६
१३ नाशिक ११८०
१४ नाशिक मनपा २१२७
१५ मालेगाव मनपा १०४
१६ अहमदनगर ३०६३
१७ अहमदनगर मनपा ६२०
१८ धुळे १७०
१९ धुळे मनपा १२२
२० जळगाव ६४५
२१ जळगाव मनपा १७३
२२ नंदूरबार २१०
नाशिक मंडळ एकूण ८४१४
२३ पुणे ३१८९
२४ पुणे मनपा ३००३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १७३६
२६ सोलापूर १९२८
२७ सोलापूर मनपा २८३
२८ सातारा २०१४
पुणे मंडळ एकूण १२१५३
२९ कोल्हापूर ७०७
३० कोल्हापूर मनपा १६०
३१ सांगली १६२२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २६८
३३ सिंधुदुर्ग ५६३
३४ रत्नागिरी ७४१
कोल्हापूर मंडळ एकूण ४०६१
३५ औरंगाबाद ५९५
३६ औरंगाबाद मनपा ३७१
३७ जालना २८३
३८ हिंगोली २२३
३९ परभणी ४२७
४० परभणी मनपा १४२
औरंगाबाद मंडळ एकूण २०४१
४१ लातूर ९०२
४२ लातूर मनपा २८३
४३ उस्मानाबाद ५७७
४४ बीड १५२९
४५ नांदेड ३१५
४६ नांदेड मनपा १४७
लातूर मंडळ एकूण ३७५३
४७ अकोला ३५२
४८ अकोला मनपा ४०३
४९ अमरावती ६५८
५० अमरावती मनपा २५४
५१ यवतमाळ ११३८
५२ बुलढाणा २३१०
५३ वाशिम ४१०
अकोला मंडळ एकूण ५५२५
५४ नागपूर १६१४
५५ नागपूर मनपा २६८९
५६ वर्धा ८५९
५७ भंडारा ६०५
५८ गोंदिया ५०४
५९ चंद्रपूर १११८
६० चंद्रपूर मनपा ७७३
६१ गडचिरोली ३३५
नागपूर एकूण ८४९७
एकूण ५१८८०
(टीप-आज नोंद झालेल्या एकूण ८९१ मृत्यूंपैकी ३९७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. हे २३६ मृत्यू, नागपूर-५९, ठाणे-३०, नाशिक-२९, जळगाव-२०, नंदूरबार-१८,पुणे-१७, चंद्रपूर-१२, औरंगाबाद-८, भंडारा-८, गडचिरोली-५, ज़ालना-४, गोंदिया-३, नांदेड-३, सोलापूर-३, वाशिम-३, अहमदनगर-२, सांगली-२, यवतमाळ-२, हिंगोली-१, कोल्हापूर-१, लातूर-१, पालघर-१, परभणी-१, रायगड-१, रत्नागिरी-१ आणि सातारा-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०४ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे