Friday, August 19, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यपाल महोदयांचं वक्तव्य हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहेच, जाहीर माफी मागितली पाहिजे

by Team Global News Marathi
July 30, 2022
in मुंबई
0
15 जूनला आदित्य ठाकरे शेकडो शिवसैनिकांसह अयोध्यात घेणार रामलल्लाचे दर्शन घेणार!
ADVERTISEMENT

 

मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून टीका होत आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला आहे. महाराष्ट्रात सध्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि विकासात वाढ नाही तर वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यपाल महोदयांचं वक्तव्य हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहेच, त्याचसोबत ह्या मातीत जन्मलेल्या अनेक थोर व्यक्तींच्या योगदान आणि बलिदानाचा देखील अनादर आहे. या वक्तव्याची निंदा करावी तितकी कमीच… महाराष्ट्र आणि मराठी विरोधी भूमिकेसाठी त्यांनी जाहीर माफी मागावी, असं आदित्य ठाकरेंनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

तर दुसरीकडे भाजपाचे नेते नितेश राणे यांनी भगतसिंग कोश्यारींची बाजू घेतली आहे. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही असं म्हटलं आहे. तसेच “…तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का?” असा सवाल देखील विचारला आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “एवढेच कशाला… तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदीकडे देऊन ठेवली आहे ते चालत का? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही??” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा अद्याप दिलाच नाही !

Next Post

“मराठी माणसांचा अपमान केलाच, पण हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम राज्यपालांनी केलंय!”

Next Post
राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या यादीवर आज होणार निर्णय

"मराठी माणसांचा अपमान केलाच, पण हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम राज्यपालांनी केलंय!"

Recent Posts

  • “आता कसं वाटतंय…?”, फडणवीसांनी गोविंदांना विचारलं अन् हेही सांगितलं!
  • औरंगाबादचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात सामील ‘पक्षात सर्व अंबादास दानवेंना…..
  • शरद पवारांचे मार्गदर्शन घेणार, अब्दुल सत्तारांनी सांगितली रणनीती
  • १५०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात हसन मुश्रीफांच्या चौकशीसंदर्भात लोकायुक्तांद्वारे २४ऑगस्टला सुनावणी
  • शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group