ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना देखील टोला लगावला. त्या भंडाऱ्यात बोलत होत्या. राज्यातील शिंदे,फडणीस सरकार जानेवारी महिन्यात कोसळणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भोंडेकर हे विदर्भातील माझे सर्वात लाडके भाऊ आहेत. त्यांना नक्कीच भेटणार असून, नरूभाऊ येणारी निवडणूक जिंकणार नाहीत. भंडारा येथून मी निवडणूक लढवण्यापेक्षा या जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारीच भोंडेकरांसाठी त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सक्षम असल्याचा घणाघात अंधारे यांनी केला आहे. नीती आयोगावरू निशाणा दरम्यान यावेळी अंधारे यांनी नीती आयोगावरून देखील सरकारला टोला लगावला आहे. महारष्ट्र तोडण्याची भाषा करण्यापेक्षा राज्य सरकारने राज्य जोडण्याची भाषा करावी. विकास कामांवर लक्ष दिले पाहिजे. नीती आयोगाला सल्ला देण्यासाठी मित्र नावाची संस्था तयार केली.
मुख्यमंत्री यांचे मित्र अजय अशर यांना मुख्य कार्यकारी पदावर बसविले. अशर यांना बांधकाम विभागाचा अनुभव असताना त्यांना नीती आयोगाची जबाबदारी देण्यात आली. यावरून राज्य सरकारची जखम पायाला आणि मलम डोक्याला अशी भूमिका दिसून येते. या माध्यमातून विदर्भ वेगळा करण्याची देवेंद्र फडणवीस यांची नीती असल्याचा आरोप आंधरे यांनी केला आहे.