नवी दिल्ली | २०२४ मध्ये पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अवघे सोळा महिने शिल्लक राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू असून लोकसभेत परत एकदा स्वबळावर सत्ता आणण्यासाठी एक वर्षापूर्वीपासून भाजपचे ‘मिशन 144’ काम सुरु झाले.या मिशन 144 अंतर्गत देशातील 144 असे लोकसभा मतदारसंघ निवडले गेले आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दुसऱ्या क्रमांकावर राहत पराभवाचा सामना करावा लागला, किंवा असे लोकसभा मतदारसंघ जिथे स्थानिक आघाडीमुळे भारतीय जनता पक्ष आजवर निवडणूक लढली नाही अशा मतदारसंघांची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातल्या 18 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
दक्षिण मध्य मुंबई, मध्य मुंबई, पालघर, कल्याण, चंद्रपूर, हिंगोली, म्हाडा, बुलढाणा, धाराशिव औरंगाबाद, शिरूर, शिर्डी, बारामती, सातारा, हातकणंगले, कोल्हापूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड या मतदार संघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे,
चार लोकसभा मतदारसंघ मिळून एक क्लस्टर तयार करण्यात आले 18 लोकसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्रात पाच क्लस्टर पाच करण्यात आले असून पाच केंद्रीय मंत्र्यांवर पाच क्लस्टरची जबाबदारी देण्यात आली.
कोणत्या मंत्र्यांकडे कोणते मतदारसंघ?
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे दक्षिण मध्य मुंबई, मध्य मुंबई, पालघर, कल्याण हे चार लोकसभा मतदारसंघ देण्यात आले
केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे शिरूर, शिर्डी, बारामती आणि रायगड या चार लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी देण्यात आली
केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांच्याकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा, म्हाडा व धाराशिव या चार लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी देण्यात आली
तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे हातकणंगले व कोल्हापूर या दोन लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी देण्यात आली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या 18 लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्प सभांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात झाली. यात 2019 च्या लोकसभेमध्ये भाजपचा पराभव झालेले लोकसभा मतदारसंघ आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाच्या गटात असलेले लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.