Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत ठाकरे कुटुंबातून कोण येणार? चव्हाण म्हणतायत की,

by Team Global News Marathi
October 22, 2022
in महाराष्ट्र
0
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत ठाकरे कुटुंबातून कोण येणार? चव्हाण म्हणतायत की,

 

मुंबई | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातली राजकारण ढवळून निघाले आहे.महाराष्ट्रातून लवकरच भारत जोडो यात्रा पोहोचणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे होणार सहभागी होणार आङे, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिलेलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुढील महिन्यात नांदेड मध्ये येणार आहे.सात नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये येईल. नांदेडमध्ये ही यात्रा पाच दिवस राहणार आहे. नऊ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. तर आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार असल्याची माहिती माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील काँग्रेस कडून निमंत्रण देण्यात आले आहे, ते सहभागी होणार आहे की नाही, ते लवकरच स्पष्ट करतील, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं. राज्य सरकारने अतिवृष्टीचे पैसे अजून दिले नाही. दिवाळी १०० रुपयांमध्ये शिधा वाटपाची घोषणा केली खरी पण अजून शिधा वाटप नाही. आता पुन्हा परतीच्या पावसामुळे राज्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे आता सरकारने नुसत्या घोषणा करू नये तर शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्यावी, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली. राज्य सरकारने एमआयडीसीच्या जागांवरची स्थगिती उठवून उद्योजकांना मदत केली. ही चांगली गोष्ट आहे. पण जिल्ह्या-जिल्ह्यात सार्वजनिक कांमाना दिलेली स्थगिती कधी उठवणार आहात? असा सवालही अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला विचारला.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
शिवसेनेला पुन्हा खिंडार पडणार? ठाकरे गटाचे उरलेले आमदार ऑन दी वे, कधीही भाजपात येणार

शिवसेनेला पुन्हा खिंडार पडणार? ठाकरे गटाचे उरलेले आमदार ऑन दी वे, कधीही भाजपात येणार

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group