Friday, September 22, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्याच्या नामांतरावर पुणेकरांना काय वाटत ते महत्वाचं उगाच बाहेरच्यांना सल्ला देऊ नये

by Team Global News Marathi
January 14, 2023
in राजकारण
0
पुण्याच्या नामांतरावर पुणेकरांना काय वाटत ते महत्वाचं उगाच बाहेरच्यांना सल्ला देऊ नये

 

पुणे शहराचे नामकरण ‘जिजाऊ नगर’ व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. संभाजी ब्रिगेडनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही मागणी केली आहे. त्यामुळे पुणे शहर नामांतराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील पुण्याच्या नामांतरावरून भाष्य केले आहे.

आज पिंपरी-चिंचवडमध्ये आले असताना माध्यमांशी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, पुणे हे मिनी इंडिया आहे. त्यामुळे पुण्याच्या नामांतरावरून मूळ पुणेकरांना काय वाटेल याचा विचार करायला पाहिजे. उगाच बाहेरच्यांनी सल्ले देऊ नये, सल्ले दिल्याने अडचणी ठरतात. कुणाबद्दलही अनादर होणार नाही, अशी सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे. सगळीच नावे चांगली आहेत. पुणे हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुढे अजित पवार म्हणाले, सध्या राज्यात महागाई, बेरोजगारीचे प्रश्न असताना राज्यात नवीन नवीन प्रस्ताव पुढे येत आहेत. त्यामुळे याबाबत बोलणे आमच्यासारख्या राजकीय नेत्याला अवघड जाते. आता सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्या आहेत. या प्रश्नावर सगळे मिळून चर्चा करून, विश्वासात घेऊन निर्णय अपेक्षित आहे. पुणे हे आता कुणा एकाचे राहिलेले नाही. पुणे मिनी इंडिया आहे. तसेच, पिंपरी-चिंचवडला पुण्याचाच भाग समजला जातो. माझी विनंती आहे की, महत्त्वाचे विषय बाजूला ठेवायचे आणि बाकी विषय भरकटवायचे याबाबत सगळ्यांनी सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे, असे ते स्पष्ट म्हणाले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
पक्षाची नोंदणी रद्द करण्याची निवडणूक आयोगाची केंद्र सरकरकडे मागणी

जम्मू-काश्मिरात होणार एप्रिल महिन्यात होणार मतदान; विधानसभा निवडणुकीच्या हालचाली,

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group