मुंबई| २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या विरोधात योग्य उमेदवार म्हणीन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नसल्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय होण्याची शयकता कमी आहे असे विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले होते.
आता राऊत यांनी केलेला या विधानावर भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. महाभारतातले योद्धे संजय राऊत यांनी आधी निश्चित करावे, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, महाभारतातले योद्धे संजय राऊत यांनी आधी निश्चित करावे, की कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण? कधी ते उद्धवजींच्या तर कधी शरद पवारांच्या कोपराला गूळ लावतात.’ अशा असे ट्वीट करून अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
महाभारतातले योद्धे @rautsanjay61 यांनी आधी निश्चित करावे, की कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण? कधी ते उद्धवजींच्या कोपराला गूळ लावतात, कधी शरद पवारांच्या… pic.twitter.com/2wiUqDVsRr
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 14, 2021