राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिलेत. फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं म्हणत राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली आहे.
त्यात ज्यसभा खासदार नारायण राणे यांची २२ वर्ष मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहण्यात गेली, आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचीही जातील असा टोला मलिक यांनी लगावला होता. मलिक यांच्या या टीकेला भाजपा नेते आचार्य तुषार भोसले यांनी उत्तर दिले आहे.
‘नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री राहिले आहेत. तुमच्या नाकावर टिच्चून देवेंद्र फडणवीसजी लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होतील. कारण ते त्यांचं नाही तर जनतेचं स्वप्न आहे.
तसेच जनतेने त्यांच्याच नेतृत्वावरच शिक्कामोर्तब केला होता. पण तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा जन्मच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्यात जाणार ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तेव्हा ‘अल्प मंत्री’ असलेल्या आपण बहु चिंता करु नये’, अशी टीका भोसले यांनी केली आहे.